महाराष्ट्रात जून २०१७ मध्ये झालेल्या शेतकरी संपासंदर्भात लिहिलेल्या फेसबुक पोस्ट्स-
कामगारांचा संप प्रभावी होतो.
कारण Labour ही गोष्ट Highly Perishable आहेच आणि ती short term मध्ये replace करणे देशाच्या किंवा राज्याच्या पातळीवर देखील अशक्य असते ! त्यात करून श्रम हा अंगभूत असतो, श्रमिकाच्या इच्छेवर पुरवला जाऊ शकतो. त्याच्या production ला वेळ लागत नाही !!
कारण Labour ही गोष्ट Highly Perishable आहेच आणि ती short term मध्ये replace करणे देशाच्या किंवा राज्याच्या पातळीवर देखील अशक्य असते ! त्यात करून श्रम हा अंगभूत असतो, श्रमिकाच्या इच्छेवर पुरवला जाऊ शकतो. त्याच्या production ला वेळ लागत नाही !!
पण शेतकरी असे करू शकत नाही ! त्याचा माल हा Stock करता येतो, आणि एक order देऊन बाहेरून मागवताही येतो !! त्यात करून भाजीपाला आणि दूध यांचा सोडल्यास उर्वरित माल म्हणजे- डाळ,धान्याचा संप तर अशक्य आहे !! कारण त्याच्या Production ला अर्ध-एक वर्ष जातं. इतका वेळ ताणून धरणे साक्षात माओ आणि लेनिन एकत्र अवतरले तरी कठीण जाईल...
मुळात शेतकरी हा पुरवठादार आहे, कामगार नाही हे कोणी लक्षात घेईल का ? त्याचा संप यशस्वी होणार नाही हे कोणालाच का कळत नाहीये ?😢
अर्थशास्त्र हे अत्यंत Practical आहे. लोकांना अर्थशास्त्र म्हणजे निरुपयोगी, पोथीनिष्ठ वगैरे पढवणारे समाजाने सरळ सरळ शत्रू मानावेत ! हा प्रश्न Resource Distributionशी निगडित आहे. अर्थशास्त्र समजून न घेता, Costing-Finance-Business Theory लक्षात न घेता, अत्यंत 'उनाड'पणे आंदोलने सुरू करणे- आणि भावनिक मेसेज फिरवून, सामान्य शेतकऱ्याला त्यात होरपळवणे हा सामाजिक गुन्हा आहे.😢 असं करणारे शेतकऱ्यांचे शत्रू आहेत. हुरळली मेंढी लांडग्यांपाठी गेली तर काय होईल हे वेगळे सांगायला नकोच...
अर्थशास्त्र हे अत्यंत Practical आहे. लोकांना अर्थशास्त्र म्हणजे निरुपयोगी, पोथीनिष्ठ वगैरे पढवणारे समाजाने सरळ सरळ शत्रू मानावेत ! हा प्रश्न Resource Distributionशी निगडित आहे. अर्थशास्त्र समजून न घेता, Costing-Finance-Business Theory लक्षात न घेता, अत्यंत 'उनाड'पणे आंदोलने सुरू करणे- आणि भावनिक मेसेज फिरवून, सामान्य शेतकऱ्याला त्यात होरपळवणे हा सामाजिक गुन्हा आहे.😢 असं करणारे शेतकऱ्यांचे शत्रू आहेत. हुरळली मेंढी लांडग्यांपाठी गेली तर काय होईल हे वेगळे सांगायला नकोच...
व्यवस्था समजून न घेता, अर्थशास्त्रीय गणिते-सिद्धांत-मांडणी न समजता; आक्रस्ताळेपणा करणाऱ्या समाजगटांचा तोटा होतो, त्यातल्या गरीब गटाचे कायमचे नुकसान होते ज्याची भरपाई कोणीच देत नाही- पेटवणारे मेसेज लिहिणारे 'अडाणभंपक' तर अजिबात देत नाहीत 😏
लोह परिसा रुसले,
सोनेपणास मुकले |
ज्याने कोणाचे काय गेले,
ज्याचे त्याने अहित केले ||
सोनेपणास मुकले |
ज्याने कोणाचे काय गेले,
ज्याचे त्याने अहित केले ||
त्यामुळे लवकर शहाणे व्हा, खऱ्या मुद्द्यांसाठी सूज्ञपणे पाठपुरावा करायला शिका, आणि या लांडग्यांच्यापाठी हुरळून जाऊन स्वतःचे नुकसान करून घेऊ नका हीच महाराष्ट्रातल्या प्रामाणिक संपकरी शेतकऱ्यांना विनंती...
- 🖊मकरंद देसाई
(बाकी शिव्या-धमकी-टिंगल यांची आता सवय झाली आहे. एसी एसी करणाऱ्यांनी मात्र अजूनही मला एसी पाठवलेला नाही 😢 त्याचे वाईट वाटते इतकेच 😸😸)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा