मंगळवार, ६ जून, २०१७

शेतकरी संप, कर्जमाफी आणि बरंच काही...

महाराष्ट्रात जून २०१७ मध्ये झालेल्या शेतकरी संपासंदर्भात लिहिलेल्या फेसबुक पोस्ट्स-

  • शेतकऱ्यांचा संप !
    सध्याचा महाराष्ट्रातील 'हॉट' टॉपिक !!
    यामध्ये काही प्रमाणात घुसलेला ब्राह्मण द्वेषाचा प्रादुर्भाव, मध्ययुगीन मान'सिक'ता, राजकीय पुनरुज्जीवन वगैरे आहेच...
    पण, जरा मुख्य मुद्द्यांचाही विचार करू.
    आजच्या संप-आंदोलनाच्या नेमक्या मागण्या काय आहेत ?
    कर्जमाफी आणि कोरा सातबारा ही प्रमुख मागणी !
    कर्जमाफी का नसावी हा मुद्दा खूपवेळा चर्चिला गेला आहेच. (या मुद्द्यावर प्रामाणिक आणि ठाम राहिल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांचे मनापासून अभिनंदन आणि आभार.)
    मोठे जमीनदार, सहकारी सावकार आणि त्यांचे राजकीय हस्तक हे आत्तापर्यंतच्या कर्जमाफीचे लाभार्थी आहेत. लहान शेतकरी नव्हे ! त्यात वारंवार राजकीय दबावाखाली कर्जमाफी दिल्यामुळे, "कर्ज घ्या-मजा करा-मग प्रेशर ग्रुप बनवा- माफ करून घ्या" ही वृत्ती सोकावते आहे. जिचा राज्याला आणि देशाला मोठा धोका आहे. ही बेजबाबदार, झुंडीने नियम डावलायची वृत्ती एकदिवस आपला इथिओपिया/ग्रीस करील.
    दुसरा मुद्दा हमीभाव, दर देण्याचा आहे. हा भयंकर किचकट मुद्दा आहे.ज्याचं उत्तर झुंडगिरीने निघणे अशक्य आहे. मुळात नुकत्याच APMCबाबत सुधारणा करण्यात आल्या होत्या. शेतकऱ्यांना मुक्त बाजार उपलब्ध होण्यासाठी पावले टाकली गेली होती. (e-NAM Portal नक्की चेक करा...) मात्र वाढवायला हवाय. पण असे असताना आम्ही मागू तो भाव द्याच, आमचा माल घ्याच, हा हेका काही थांबत नाही. तुरीच्या बाबतीत सरकारने वारेमाप खरेदी केली आहे. कारण काय ? या वर्षी तुरीचा शेतकरी आक्रमक झाला ! गेल्यावर्षी तुरीचा ग्राहक आक्रमक झालेला तेव्हा याच सरकारने तुरीचे रेशनिंग केले होते ! म्हणजे इथे शास्त्रशुद्ध धोरण, नियम वगैरेपेक्षा कोण किती आक्रमक यावर शेतमालाचे सरकारी व्यवस्थापन अवलंबून आहे. ही चिंतेची बाब आहे, यासाठी सरकारला धारेवर धरायला हवे, पण ते धोरणनिश्चितीसाठी ! हडेलहप्पी, राजकीय पुनरुज्जीवन, व्यक्ती/जातीद्वेषासाठी नव्हे.
    बाकी शेतकऱ्यांच्या overall हिताचे म्हणाल तर या आणि केंद्र सरकारने जलयुक्त शिवार, पीकविमा, e-NAM वगैरे चांगली कामे केली आहेत. अजून प्रगती हवीच आहे, गरजेची आहे... पण तुलना करता हे सरकार मागच्या सरकारच्या तुलनेत जास्त 'शेतकरी-मित्र' आहे, शत्रू नव्हे !
    आता काही भ्रम दूर करू.
    भ्रम - "शेतकऱ्याने पेरलेच नाही तर खाल काय ?"
    निरास - यामुळे सर्वाधिक नुकसान शेतकऱ्याचेच होईल (उदा.गिरणी कामगार) आणि फक्त महाराष्ट्राच्या काही भागात संप झालाय, त्यामुळे इम्पोर्ट वगैरे दूरची बाब, दुसऱ्या राज्यातील शेतकरी या संधीचा लाभ उठवून नफा कमवत आणि शहरांचे अन्न सुरूच राहील !
    भ्रम - "सैन्यात आमचीच मुलं आहेत, ती परत बोलवू"
    निरास - हा सरळ सरळ देशद्रोहाचा प्रकार असून, अशा विधानांवर कारवाई होऊ शकते. पण ती होणार नाही, त्याचे एकमेव कारण म्हणजे हे हास्यास्पद आहे !! सैन्यात तुमची मुलं आहेत, तर शहरात कोण एलियन राहतात का ??
    भ्रम - "आम्ही पोशिंदे आहोत, आमच्याशिवाय तुम्ही कुठे जाल ?"
    निरास - असं म्हणणाऱ्यांना आजची व्यवस्था कळलीच नाही. ते मध्ययुगात, बलुतेदारीतच मग्न आहेत. जनमत तुमच्या अडवणुकीने क्षुब्ध झालं तर 'जमीन हस्तांतरण कायदा' सुधारित रूपात संमत व्हायला वेळ लागणार नाही. शेतजमीन Freely Transferable झाली की पोशिंदे वगैरे शब्द घरात फ्रेम करून लावावे लागतील. तुमचा लाडका अंबानी हेक्टरच्या हेक्टर खरेदी करून दशांश मनुष्यबळ वापरून, दुप्पट उत्पादन घेऊन - नफ्यात विकू शकतो. तेही लागल्यास कर भरूनसुद्धा !! एकदा Precision Farming म्हणजे काय ते बघा. जग आधीच तिकडे पोचलं आहे. आपल्याकडे फक्त Scale of Operation कमी असल्यामुळे ते अजून सर्वत्र वापरात आलेलं नाही. ज्या दिवशी कॉर्पोरेट्स शेतीत घुसतील त्या दिवशी ते भारतात येईल आणि शेतीचं रुपडं कायमचं बदलेल.
    त्यामुळे आपल्या हिताच्या बाजूने नक्की कोण आहे याचा एकदा नक्की विचार करा. दूध रस्त्यावर ओतलंत म्हणून मला काडीचीही हरकत नाही !! कारण तुमच्या मालकीच्या दुधाने तुम्ही रस्ते भरा किंवा माणसांना अंघोळ घाला - तो तुमचा हक्क आहे. मी अन्नाला Commodity मानतो, Necessity या प्रकारात मोडणारी एक बाजारातील वस्तू ! पूर्णब्रह्म वगैरे काहीही मानत नाही. त्यामुळे ते दूध अनाथांना द्या वगैरे फालतू सल्ले, भावनिक विनवण्या मान्य नाहीत. तुम्ही टाकलेलं दूध एक-दोन दिवस त्रास देईल, पण असेच राहिलात तर अमूल कायमचं मार्केट खाऊन टाकील, हे लक्षात असू द्या !!
    आता हे लिहिल्याबद्दल शिव्या-धमक्या-चेष्टा वगैरे गृहीतच धरलेली आहे. एसीत बसण्याचा आरोप करणार असाल तर आभारी आहे advance मध्ये; तेवढा एक एसी पाठवून द्यायचं बघा !!
    खोकला झालेला असताना - ice cream खाऊ नको म्हणणारा, कडू औषधे, टोचणारी इंजेक्शने देणारा डॉक्टर आणि मस्त, (एसीत बसवून !) ice cream खाऊ घालणारा ice creamचा दुकानदार यात आवडणारा कोण हे स्पष्टच आहे ! त्यात काही वावगं नाही. परंतु यातला हितकर कोण याचीही निवड 'गोड कोण बोलतो' यावरच करणार असाल तर फक्त शुभेच्छाच देऊ शकतो !
    वाटल्यास हे परत एकदा वाचा, विचार करा आणि मग काय शिव्या-धमक्या द्यायच्या त्या बिनधास्त द्या, I am waiting for them...
    🖊️मकरंद देसाई
    #महाराष्ट्र


कामगारांचा संप प्रभावी होतो.
कारण Labour ही गोष्ट Highly Perishable आहेच आणि ती short term मध्ये replace करणे देशाच्या किंवा राज्याच्या पातळीवर देखील अशक्य असते ! त्यात करून श्रम हा अंगभूत असतो, श्रमिकाच्या इच्छेवर पुरवला जाऊ शकतो. त्याच्या production ला वेळ लागत नाही !!
पण शेतकरी असे करू शकत नाही ! त्याचा माल हा Stock करता येतो, आणि एक order देऊन बाहेरून मागवताही येतो !! त्यात करून भाजीपाला आणि दूध यांचा सोडल्यास उर्वरित माल म्हणजे- डाळ,धान्याचा संप तर अशक्य आहे !! कारण त्याच्या Production ला अर्ध-एक वर्ष जातं. इतका वेळ ताणून धरणे साक्षात माओ आणि लेनिन एकत्र अवतरले तरी कठीण जाईल...
मुळात शेतकरी हा पुरवठादार आहे, कामगार नाही हे कोणी लक्षात घेईल का ? त्याचा संप यशस्वी होणार नाही हे कोणालाच का कळत नाहीये ?😢
अर्थशास्त्र हे अत्यंत Practical आहे. लोकांना अर्थशास्त्र म्हणजे निरुपयोगी, पोथीनिष्ठ वगैरे पढवणारे समाजाने सरळ सरळ शत्रू मानावेत ! हा प्रश्न Resource Distributionशी निगडित आहे. अर्थशास्त्र समजून न घेता, Costing-Finance-Business Theory लक्षात न घेता, अत्यंत 'उनाड'पणे आंदोलने सुरू करणे- आणि भावनिक मेसेज फिरवून, सामान्य शेतकऱ्याला त्यात होरपळवणे हा सामाजिक गुन्हा आहे.😢 असं करणारे शेतकऱ्यांचे शत्रू आहेत. हुरळली मेंढी लांडग्यांपाठी गेली तर काय होईल हे वेगळे सांगायला नकोच...
व्यवस्था समजून न घेता, अर्थशास्त्रीय गणिते-सिद्धांत-मांडणी न समजता; आक्रस्ताळेपणा करणाऱ्या समाजगटांचा तोटा होतो, त्यातल्या गरीब गटाचे कायमचे नुकसान होते ज्याची भरपाई कोणीच देत नाही- पेटवणारे मेसेज लिहिणारे 'अडाणभंपक' तर अजिबात देत नाहीत 😏
लोह परिसा रुसले,
सोनेपणास मुकले |
ज्याने कोणाचे काय गेले,
ज्याचे त्याने अहित केले ||
त्यामुळे लवकर शहाणे व्हा, खऱ्या मुद्द्यांसाठी सूज्ञपणे पाठपुरावा करायला शिका, आणि या लांडग्यांच्यापाठी हुरळून जाऊन स्वतःचे नुकसान करून घेऊ नका हीच महाराष्ट्रातल्या प्रामाणिक संपकरी शेतकऱ्यांना विनंती...
🖊मकरंद देसाई
(बाकी शिव्या-धमकी-टिंगल यांची आता सवय झाली आहे. एसी एसी करणाऱ्यांनी मात्र अजूनही मला एसी पाठवलेला नाही 😢 त्याचे वाईट वाटते इतकेच 😸😸)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा