सोमवार, २६ जून, २०१७

हॅरी पॉटरच्या दुनियेत : Albus Dumbledore

Albus Dumbledore !


हॅरी पॉटरच्या शाळेचा हेडमास्तर... Prof. Dumbledore म्हणजे -
पांढरी दाढी, मिश्किल डोळे आणि वयाबरोबर आवाजात आलेली अनुभवाची खोली... हॅरीच्या दुनियेतला सर्वात ताकदवान Wizard, Order of Phoenix चा प्रमुख आणि हॅरीला वाट दाखवणारा, वाचवणारा आणि शिकवणारा आदर्श आचार्य  !

या अफाट पात्राच्या नांवाचा अफाटतेची सुरुवात त्याच्या नांवांपासून होते ! त्याचे पूर्ण नांव - 'Albus Percival Wulfric Brian Dumbledore' असे भले मोठ्ठे आहे... 
पैकी Albus म्हणजे शुभ्र, 
Percival हा शब्द लढाईचा इतिहास असल्याची हिंट देतो (हे नांव किंग आर्थरच्या दरबारातील ख्यातनाम सरदाराचे होते !) 
Wulfric चा जरासा विचित्र अर्थ wolf power असा येतो ज्याचा इथला अर्थ भन्नाट ताकद इतकाच घेऊ,
Brian या जुन्या Celtic शब्दाचा अर्थ आहे महान/उच्च नैतिक मूल्ये असलेला 
आणि Dumbledore या बऱ्याच जुन्या शब्दाचा अर्थ आहे 'Bumblebee' किंवा 'Humble bee' म्हणजे माशीचे कानाला गोड गुणगुणणे !
या पैकी Albus हे नांव आपल्या मिश्किल हेडमास्तरच्या आयुष्याचं, भूमिकेचं सर्वात अचूक वर्णन आहे ! व्होल्डमोर्टला डार्क लॉर्ड म्हणतात त्यामुळे Albus हे नांव त्यांच्यातील द्वंद्व अचूक टिपते...

Dumbledore शिवाय हॅरी पॉटरच्या सिरीजमध्ये काहीच उरत नाही असे म्हटले तरी वावगे ठरत नाही... ज्यांना हॅरी पॉटर कळलंय त्यांना माहीतच असेल की खरी लढाई हॅरी विरुद्ध व्होल्डमोर्ट अशी नसून Dumbledore विरुद्ध व्होल्डमोर्ट अशी आहे... हॅरी हा त्या लढाईचा महत्त्वपूर्ण मोहरा आहे, पण लढाईचा सूत्रधार Dumbledoreच आहे... Dumbledore आणि व्होल्डमोर्ट यांच्या विचारसरणीतील युद्ध म्हणजे हॅरी पॉटर सीरिज... 

मृत्यूला थकवा आल्यानंतर आलेली सुखाची निद्रा मानणारा Dumbledore विरुद्ध मृत्यूपासून पळणारा, अमर होण्यासाठी Horcrux, Unicorn Blood सारख्या अघोरी उपायांना वापरणारा लॉर्ड व्होल्डमोर्ट...

विझार्ड असोत, mudblood असोत किंवा muggles त्यांना वागणूक समानतेचि मिळावी हे मूल्य दर्शवणारा Dumbledore विरुद्ध शुद्ध रक्ताची, उच्च वंशाची, वर्णवर्चस्वाची काळी बाजू दर्शवणारा लॉर्ड व्होल्डमोर्ट !

Elder Wand असलेल्या Gellert Grindlewald ला हरवून, त्या छडीची मालकी मिळवणारा, अफाट ताकद-ज्ञान आणि अनुभव असलेला परंतु आयुष्यात एकदाही Avada Kedavra हा मृत्युमंत्र न वापरणारा Dumbledore
विरुद्ध Elder Wand च्या ताकदीसाठी हपापलेला, परंतु तिची मर्जी कधीच न लाभलेला; Avada Kedavra हा ज्याचा Signature Spell आहे असा डार्क लॉर्ड व्होल्डमोर्ट !

Dumbledore काही scenes मध्ये तर मनावर कायमची छाप पाडून जातो ! सगळे सांगणं कठीण आहे तरी त्यातील सर्वोत्तम मानावा असा एक प्रसंग म्हणजे - Order Of The Phoenix या भागातील Ministry Atrium मध्ये हॅरीला वाचवण्यासाठी लॉर्ड व्होल्डमोर्टसमोर उभा ठाकणारा Dumbledore ! इथे व्होल्डमोर्ट पूर्ण आक्रमक असतो, मृत्यूमंत्रांचे वार करत असतो, Fiendfyreची माया वापरतो... उलट Dumbledore मात्र हॅरीला वाचवण्यासाठी, व्होल्डमोर्टला तटवून ठेवून Aurors समोर त्याला उघडं पाडण्यासाठी लढत असतो... तरीही शेवटी Dumbledore व्होल्डमोर्टला जड जातो !त्यांच्यातील Dumbledore  व्होल्डमोर्टला मात देऊन जातो...

व्होल्डमोर्ट त्याला खुन्नस देत विचारतो : “You do not seek to kill me, Dumbledore?” “Above such brutality, are you?”
आणि Dumbledore शांतपणे उत्तरतो : “We both know that there are other ways of destroying a man, Tom,” !!!

एकतर बाकीचे लोक त्याचं Voldemort हे त्याने परिधान केलेलं नांवसुद्धा घ्यायला घाबरत असताना, Dumbledore त्याला त्याच्या तोंडावर 'टॉम' या त्याच्या खऱ्या, बालपणीच्या नांवाने हाक मारतो !! आणि दुसरं म्हणजे - एखाद्याला संपवण्याचे जीव घेणाव्यतिरिक्त अजूनही मार्ग असतात असं Dumbledore त्या अमरत्वाचा आशेने झपाटलेल्या सैतानासमोर ठणकावून सांगतो !!! व्होल्डमोर्ट Dumbledoreच्या ताकदीपेक्षा या निडर, शांत, स्थितप्रज्ञतेला जास्त घाबरत असावा... त्या प्रसंगात पुढे व्होल्डमोर्ट कपटीपणाने हॅरीला झपाटतो. जेणेकरून Dumbledore त्याला संपवण्यासाठी हॅरीवर वार करेल आणि मग व्होल्डमोर्ट दुसऱ्या कुठल्यातरी Horcrux द्वारे पुन्हा जिवंत होऊन त्या भविष्यवाणीच्या भयातून मुक्त होईल. पण Dumbledore  शेवटी Dumbledore असतो ! 

तो त्याचं आधीचं वाक्य खरं करून दाखवतो. तो हॅरीला त्याची माणसं, चांगल्या आठवणी, हरमायनी-रॉनशी असलेली मैत्री, सिरीयसचं बलिदान आठवायला सांगतो !! त्या भावनांची allergy असलेला व्होल्डमोर्ट ते सहन न होऊन पळून जातो !! या प्रसंगातून Dumbledore डार्क लॉर्डचा तात्त्विक पराभव तर करतोच, पण त्याचबरोबर हॅरीला त्याच्याशी कसं लढायचं हे कायमसाठी शिकवून जातो... योद्धा बनलेला असताना त्याच्यातला गुरु जागाच असतो !

Dumbledore शेवटी स्वतःच बलिदान देतो, स्नेपकडून बलिदान घडवून आणतो आणि हॅरीला मृत्यूच्या दारातील काल्पनिक King's Cross स्टेशनवर शेवटचा उपदेश करून त्याला त्या डार्क लॉर्डवर शेवटचा घाव घालण्यासाठी सिद्ध करतो ! म्हणूनच ते युद्ध Dumbledore विरुद्ध व्होल्डमोर्ट असे असते... ज्यात Dumbledore  निर्विवादपणे जिंकतो, तेही त्याच्याच नियमांनुसार !!

Dumbledore च्या आधीच्या आयुष्यात Gellert Grindlewald शी त्याचे संबंध 'मैत्रीच्या पल्याड मधुर' असल्याचे रोलिंगबाईंनी सुचवले आहे ! होमोफोबिक प्रवृत्तींना ही एक प्रकारची साहित्यिक चपराक असावी !! Dumbledore सारखा शक्तिशाली, महान आणि आदरणीय माणूस समलैंगिक असला तरी महानच राहतो हे रोलिंगबाईंनी हॅरी पॉटरच्या प्रौढ वाचकांवर ठसवण्याचा प्रयत्न केला आहे... माणसाचे लैंगिक आयुष्य हा त्याच्या योगदानाची, महानतेची आणि क्षमतेची पातळी जोखण्याचा मुद्दा नसावा हा संदेश Dumbledore च्या आयुष्यातील Grindlewald प्रकरण देऊन जातं... 

याच Grindlewald समोर, तो सैतान बनल्यावर Dumbledore उभा राहतो आणि त्याला हरवतो. पुढे Philosopher's Stone या भागाच्या शेवटी - Neville Longbottom चं कौतुक करताना Dumbledore म्हणतो - 
"There are all kinds of courage. It takes a great deal of bravery to stand up to our enemies, but just as much to stand up to our friends" 
Dumbledore वरचं वाक्य Grindlewald च्या बाबतीत अक्षरशः जगलेला असतो !!

Dumbledore हे मी वाचलेल्या साहित्यिक पात्रांपैकी सर्वांत महान पात्रांपैकी एक आहे.... Dumbledore सारखी पात्रे असल्यामुळेच हॅरी पॉटर सीरिज ही 'kids' fiction' न राहता, मोठेपणीही तुम्हाला प्रगल्भ करत जाते... Dumbledore चे धडे आपण Muggles सुद्धा गिरवू शकतो - आपापलं 'खरं' आयुष्य जास्त समजून घेण्यासाठी आणि त्या समजेबरोबर शहाणं होण्यासाठी.... हे पात्र लिहिणे ही साहित्यिक पात्रनिर्मितीच्याबाबतीत रोलिंगबाईंना जवळपास व्यासांच्या बरोबरीला नेणारी गोष्ट आहे असं मला वाटतं !!

शेवटी Dumbledore म्हणजे कोण ?

Dumbledore म्हणजे “Do not pity the dead Harry. Pity the living, and, above all, those who live without love” म्हणणारा इहवादी तत्वज्ञ !

Dumbledore म्हणजे “After all, to the well organized mind, death is but the next great adventure” हे कळलेला मृत्युंजय मानवी स्वभाव !

Dumbledore म्हणजे प्रगल्भ, अनुभवी तरीही सकारात्मक राहणारी मानवी वृत्ती !

Dumbledore म्हणजे “Happiness can be found even in the darkest of times, if one only remembers to turn on the light” म्हणत सैतानाशी लढण्याची प्रेरणा जागवणारा चाणाक्ष नेता !

Dumbledore म्हणजे गुरु कसा असावा हे सांगणारा वस्तुपाठ !!

Dumbledore म्हणजे ...

Dumbledore म्हणजे “It is our choices, Harry, that show what we truly are, far more than our abilities” हे जीवनरहस्य अलगदपणे शिकवणारा वृद्ध आचार्य !!!






(*सर्व चित्रे व छायाचित्रे गूगल इमेजेसवरून घेतली आहेत. त्यांचे हक्क त्यांच्या मूळ मालकांच्या स्वाधीन...)

मंगळवार, ६ जून, २०१७

शेतकरी संप, कर्जमाफी आणि बरंच काही...

महाराष्ट्रात जून २०१७ मध्ये झालेल्या शेतकरी संपासंदर्भात लिहिलेल्या फेसबुक पोस्ट्स-

  • शेतकऱ्यांचा संप !
    सध्याचा महाराष्ट्रातील 'हॉट' टॉपिक !!
    यामध्ये काही प्रमाणात घुसलेला ब्राह्मण द्वेषाचा प्रादुर्भाव, मध्ययुगीन मान'सिक'ता, राजकीय पुनरुज्जीवन वगैरे आहेच...
    पण, जरा मुख्य मुद्द्यांचाही विचार करू.
    आजच्या संप-आंदोलनाच्या नेमक्या मागण्या काय आहेत ?
    कर्जमाफी आणि कोरा सातबारा ही प्रमुख मागणी !
    कर्जमाफी का नसावी हा मुद्दा खूपवेळा चर्चिला गेला आहेच. (या मुद्द्यावर प्रामाणिक आणि ठाम राहिल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांचे मनापासून अभिनंदन आणि आभार.)
    मोठे जमीनदार, सहकारी सावकार आणि त्यांचे राजकीय हस्तक हे आत्तापर्यंतच्या कर्जमाफीचे लाभार्थी आहेत. लहान शेतकरी नव्हे ! त्यात वारंवार राजकीय दबावाखाली कर्जमाफी दिल्यामुळे, "कर्ज घ्या-मजा करा-मग प्रेशर ग्रुप बनवा- माफ करून घ्या" ही वृत्ती सोकावते आहे. जिचा राज्याला आणि देशाला मोठा धोका आहे. ही बेजबाबदार, झुंडीने नियम डावलायची वृत्ती एकदिवस आपला इथिओपिया/ग्रीस करील.
    दुसरा मुद्दा हमीभाव, दर देण्याचा आहे. हा भयंकर किचकट मुद्दा आहे.ज्याचं उत्तर झुंडगिरीने निघणे अशक्य आहे. मुळात नुकत्याच APMCबाबत सुधारणा करण्यात आल्या होत्या. शेतकऱ्यांना मुक्त बाजार उपलब्ध होण्यासाठी पावले टाकली गेली होती. (e-NAM Portal नक्की चेक करा...) मात्र वाढवायला हवाय. पण असे असताना आम्ही मागू तो भाव द्याच, आमचा माल घ्याच, हा हेका काही थांबत नाही. तुरीच्या बाबतीत सरकारने वारेमाप खरेदी केली आहे. कारण काय ? या वर्षी तुरीचा शेतकरी आक्रमक झाला ! गेल्यावर्षी तुरीचा ग्राहक आक्रमक झालेला तेव्हा याच सरकारने तुरीचे रेशनिंग केले होते ! म्हणजे इथे शास्त्रशुद्ध धोरण, नियम वगैरेपेक्षा कोण किती आक्रमक यावर शेतमालाचे सरकारी व्यवस्थापन अवलंबून आहे. ही चिंतेची बाब आहे, यासाठी सरकारला धारेवर धरायला हवे, पण ते धोरणनिश्चितीसाठी ! हडेलहप्पी, राजकीय पुनरुज्जीवन, व्यक्ती/जातीद्वेषासाठी नव्हे.
    बाकी शेतकऱ्यांच्या overall हिताचे म्हणाल तर या आणि केंद्र सरकारने जलयुक्त शिवार, पीकविमा, e-NAM वगैरे चांगली कामे केली आहेत. अजून प्रगती हवीच आहे, गरजेची आहे... पण तुलना करता हे सरकार मागच्या सरकारच्या तुलनेत जास्त 'शेतकरी-मित्र' आहे, शत्रू नव्हे !
    आता काही भ्रम दूर करू.
    भ्रम - "शेतकऱ्याने पेरलेच नाही तर खाल काय ?"
    निरास - यामुळे सर्वाधिक नुकसान शेतकऱ्याचेच होईल (उदा.गिरणी कामगार) आणि फक्त महाराष्ट्राच्या काही भागात संप झालाय, त्यामुळे इम्पोर्ट वगैरे दूरची बाब, दुसऱ्या राज्यातील शेतकरी या संधीचा लाभ उठवून नफा कमवत आणि शहरांचे अन्न सुरूच राहील !
    भ्रम - "सैन्यात आमचीच मुलं आहेत, ती परत बोलवू"
    निरास - हा सरळ सरळ देशद्रोहाचा प्रकार असून, अशा विधानांवर कारवाई होऊ शकते. पण ती होणार नाही, त्याचे एकमेव कारण म्हणजे हे हास्यास्पद आहे !! सैन्यात तुमची मुलं आहेत, तर शहरात कोण एलियन राहतात का ??
    भ्रम - "आम्ही पोशिंदे आहोत, आमच्याशिवाय तुम्ही कुठे जाल ?"
    निरास - असं म्हणणाऱ्यांना आजची व्यवस्था कळलीच नाही. ते मध्ययुगात, बलुतेदारीतच मग्न आहेत. जनमत तुमच्या अडवणुकीने क्षुब्ध झालं तर 'जमीन हस्तांतरण कायदा' सुधारित रूपात संमत व्हायला वेळ लागणार नाही. शेतजमीन Freely Transferable झाली की पोशिंदे वगैरे शब्द घरात फ्रेम करून लावावे लागतील. तुमचा लाडका अंबानी हेक्टरच्या हेक्टर खरेदी करून दशांश मनुष्यबळ वापरून, दुप्पट उत्पादन घेऊन - नफ्यात विकू शकतो. तेही लागल्यास कर भरूनसुद्धा !! एकदा Precision Farming म्हणजे काय ते बघा. जग आधीच तिकडे पोचलं आहे. आपल्याकडे फक्त Scale of Operation कमी असल्यामुळे ते अजून सर्वत्र वापरात आलेलं नाही. ज्या दिवशी कॉर्पोरेट्स शेतीत घुसतील त्या दिवशी ते भारतात येईल आणि शेतीचं रुपडं कायमचं बदलेल.
    त्यामुळे आपल्या हिताच्या बाजूने नक्की कोण आहे याचा एकदा नक्की विचार करा. दूध रस्त्यावर ओतलंत म्हणून मला काडीचीही हरकत नाही !! कारण तुमच्या मालकीच्या दुधाने तुम्ही रस्ते भरा किंवा माणसांना अंघोळ घाला - तो तुमचा हक्क आहे. मी अन्नाला Commodity मानतो, Necessity या प्रकारात मोडणारी एक बाजारातील वस्तू ! पूर्णब्रह्म वगैरे काहीही मानत नाही. त्यामुळे ते दूध अनाथांना द्या वगैरे फालतू सल्ले, भावनिक विनवण्या मान्य नाहीत. तुम्ही टाकलेलं दूध एक-दोन दिवस त्रास देईल, पण असेच राहिलात तर अमूल कायमचं मार्केट खाऊन टाकील, हे लक्षात असू द्या !!
    आता हे लिहिल्याबद्दल शिव्या-धमक्या-चेष्टा वगैरे गृहीतच धरलेली आहे. एसीत बसण्याचा आरोप करणार असाल तर आभारी आहे advance मध्ये; तेवढा एक एसी पाठवून द्यायचं बघा !!
    खोकला झालेला असताना - ice cream खाऊ नको म्हणणारा, कडू औषधे, टोचणारी इंजेक्शने देणारा डॉक्टर आणि मस्त, (एसीत बसवून !) ice cream खाऊ घालणारा ice creamचा दुकानदार यात आवडणारा कोण हे स्पष्टच आहे ! त्यात काही वावगं नाही. परंतु यातला हितकर कोण याचीही निवड 'गोड कोण बोलतो' यावरच करणार असाल तर फक्त शुभेच्छाच देऊ शकतो !
    वाटल्यास हे परत एकदा वाचा, विचार करा आणि मग काय शिव्या-धमक्या द्यायच्या त्या बिनधास्त द्या, I am waiting for them...
    🖊️मकरंद देसाई
    #महाराष्ट्र


कामगारांचा संप प्रभावी होतो.
कारण Labour ही गोष्ट Highly Perishable आहेच आणि ती short term मध्ये replace करणे देशाच्या किंवा राज्याच्या पातळीवर देखील अशक्य असते ! त्यात करून श्रम हा अंगभूत असतो, श्रमिकाच्या इच्छेवर पुरवला जाऊ शकतो. त्याच्या production ला वेळ लागत नाही !!
पण शेतकरी असे करू शकत नाही ! त्याचा माल हा Stock करता येतो, आणि एक order देऊन बाहेरून मागवताही येतो !! त्यात करून भाजीपाला आणि दूध यांचा सोडल्यास उर्वरित माल म्हणजे- डाळ,धान्याचा संप तर अशक्य आहे !! कारण त्याच्या Production ला अर्ध-एक वर्ष जातं. इतका वेळ ताणून धरणे साक्षात माओ आणि लेनिन एकत्र अवतरले तरी कठीण जाईल...
मुळात शेतकरी हा पुरवठादार आहे, कामगार नाही हे कोणी लक्षात घेईल का ? त्याचा संप यशस्वी होणार नाही हे कोणालाच का कळत नाहीये ?😢
अर्थशास्त्र हे अत्यंत Practical आहे. लोकांना अर्थशास्त्र म्हणजे निरुपयोगी, पोथीनिष्ठ वगैरे पढवणारे समाजाने सरळ सरळ शत्रू मानावेत ! हा प्रश्न Resource Distributionशी निगडित आहे. अर्थशास्त्र समजून न घेता, Costing-Finance-Business Theory लक्षात न घेता, अत्यंत 'उनाड'पणे आंदोलने सुरू करणे- आणि भावनिक मेसेज फिरवून, सामान्य शेतकऱ्याला त्यात होरपळवणे हा सामाजिक गुन्हा आहे.😢 असं करणारे शेतकऱ्यांचे शत्रू आहेत. हुरळली मेंढी लांडग्यांपाठी गेली तर काय होईल हे वेगळे सांगायला नकोच...
व्यवस्था समजून न घेता, अर्थशास्त्रीय गणिते-सिद्धांत-मांडणी न समजता; आक्रस्ताळेपणा करणाऱ्या समाजगटांचा तोटा होतो, त्यातल्या गरीब गटाचे कायमचे नुकसान होते ज्याची भरपाई कोणीच देत नाही- पेटवणारे मेसेज लिहिणारे 'अडाणभंपक' तर अजिबात देत नाहीत 😏
लोह परिसा रुसले,
सोनेपणास मुकले |
ज्याने कोणाचे काय गेले,
ज्याचे त्याने अहित केले ||
त्यामुळे लवकर शहाणे व्हा, खऱ्या मुद्द्यांसाठी सूज्ञपणे पाठपुरावा करायला शिका, आणि या लांडग्यांच्यापाठी हुरळून जाऊन स्वतःचे नुकसान करून घेऊ नका हीच महाराष्ट्रातल्या प्रामाणिक संपकरी शेतकऱ्यांना विनंती...
🖊मकरंद देसाई
(बाकी शिव्या-धमकी-टिंगल यांची आता सवय झाली आहे. एसी एसी करणाऱ्यांनी मात्र अजूनही मला एसी पाठवलेला नाही 😢 त्याचे वाईट वाटते इतकेच 😸😸)