२. Class सारखी ती बदलता येत नाही, सोडता येत नाही, वर्ण-Race सारखी ती जन्मभर चिकटलेली असते. मी जात मानत नाही असं म्हणून जात संपत नाही.
३. आपण कसा कुठे जन्म घेतो हे आपल्या हातात नसतं. आपल्याला जन्मतः सुदृढ शरीर मिळालं हा जितका योगायोग आहे तितकाच तुमची जातसुद्धा आहे.
४. काही लोक तुम्ही कसेही वागलात, काहीही केलंत, कोणत्याही मूल्यांना मानलंत तरी तुम्हाला "अमुक जातीचाच शेवटी" म्हणून गिल्ट देऊ पाहत असतात.
५. वरीलप्रमाणे वागणारे लोक "कोणीही" असले तरी त्यांना भुंकत फिरणाऱ्या पिसाळल्या कुत्र्यागत तुच्छ आणि हलकट मानावे.
६. तुम्हाला जात असणे म्हणजे तुम्ही जातीयवादी असणे नव्हे. तुम्हाला वर्ण असणे म्हणजे तुम्ही वर्णद्वेषी असणे नव्हे.
७. जी गोष्ट आपण काहीही केलं तरी बदलू शकत नाही त्याचा अभिमान किंवा गिल्ट बाळगणे हे कमी बुद्धीचे, मानसिक गुलामगिरीचे लक्षण आहे.
८. आरक्षण इत्यादि योजना या सरकारी पातळीवर - सामाजिक न्याय या संविधानाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार केल्या जातात. त्याबद्दल मतांतरे असू शकतात. पण त्याचा वैयक्तिक पातळीवर जातीचा गिल्ट मानण्याशी काडीचा संबंध नाही.
९. तुम्ही काळे जन्मलात आणि तुम्हाला कोणी काळा म्हणाला याची तुम्हाला लाज वाटत असेल तर तुम्ही स्वतःच रेसिस्ट असता. तुम्ही अमुक जातीत जन्मलात आणि कोणी तुम्हाला त्या जातीचा म्हणाला त्याचा तुम्हाला राग/लाज/गैरसोय वाटत असेल तर तुम्ही स्वतःच जातीवरून माणसाची लायकी जोखत असता.
१०. तात्पर्य: जात आपल्याला बदलता येत नाही, त्यामुळे ती सोडण्याचा प्रश्न उरत नाही आणि त्यासाठी गिल्ट बाळगण्याचीही गरज नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा