पेरियारांचे विचारधन!
१. पेरियारांचा संविधानाचा द्वेष करण्यावर आणि गांधींचे पुतळे तोडण्यावर भलताच भर होता. गांधींनी अन्य जातींना ब्राह्मणांचे गुलाम बनवले, गांधी ब्राह्मणांसाठी काम करतात असे त्यांचे मत होते. १९५७साली त्यांनी बंडाळीची भाषा करताना, आधी आम्ही संविधान जाळणार आणि मग गांधीचे पुतळे पाडणार अशी योजना केली होती. यासाठी हजारो लोक मृत्युमुखी पडले तर पडू द्याअसं ते म्हणत होते.
(संदर्भ १अ, १ब : पेरियारांचे १९५७मधील लिखाण)